Wednesday, 28 March 2018

राम राम मित्रांनो ........

                                                                             ।। श्री राम समर्थ ।।

नमस्कार..... 

                  माझ नावं आकाश हनुमंत पोंगडे ,तसा मी प्रोफेशन नी आय. टी  इंजीनियर चार वर्ष या क्षेत्रात काम केलं पैसा बऱ्यापैकी मिळत होता. सिस्टिम ऍडमिन असल्यामुळे सर्व्हर आणि मी.....आणि माझं केबिन....माणसांशी तसा काहीसाच संपर्क... त्या निर्जीव वस्तुमध्ये माझा जिव कोंडल्यासारखं होऊ लागलं, ना घरच्यांना वेळ देऊ शकत होतो ना स्वतःला. मग  मी ठरवलं काहीतरी वेगळं करायचं निसर्गाच्या आणि आपल्या माणसांसोबत........ असचं एकदा ऑफिस मध्ये इंटरनेट वर ब्राउजिंग करताना रेशिम शेती (sericulture) बद्द्ल मला कळाल ....ते पाहून मला...ते इंट्रस्टींग वाटल .....आणि मी त्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात करु लागलो. इंटरनेट वर खुप शोधुन सुध्दा मला मनासारखी माहिती मिळत नव्हती, आणि जरी मिळाली तरी या ठिकाणी थोडी त्या ठिकाणी थोडी अशी माहिती मिळत होती ही माहिती मला समाधानकारक वाटत नव्हती. रेशिम शेतीची पुर्ण माहिती मिळाल्याशिवाय तर मी या व्यवसायात कसा उतरणार.... !

    आज मी स्वतः एक रेशिम शेतकरी आहे आणि खुप खुश आहे. हा ब्लॉगचा उहापोह काढण्यामागे एकच उद्देश जर कुणाला ही रेशीम शेती करायची असेल तर त्याला पूर्ण माहिती एकाच जागेवर मिळावी आणि जमेल तितक्या सरळ भाषेत आणि जे लोक रेशिम शेती करत आहेत त्यांना याबाबत अपडेट ठेवण्याचा एक प्रयत्न.....आणि वेळोवेळीइतर देखील माहिती तुमच्याशी शेअर करील. 

रेशिम अळीचे संगोपन करून कोष निर्मीती करणे यालाच थोडक्यात रेशीम शेती म्हणतात.
आणि हो बरका याचा कोशापासूनच रेशमी धागा तयार केला जातो, या धाग्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोठी मागणी आहे. याबद्दल देखील मी तुम्हाला सविस्तर माहिती देईलच.  
 
 रेशिम अळीचे मूळ खाद्य हे तुतुचा पाला आहे, रेशिम शेती करण्यासाठी किमान १ एकर शेती हवी आहे,यात तुतीची लागवड करावी लागते. १ एकर तुतीची लागवड केली तर साधारण २४ बाय ४० चे शेड आवश्यक आहे, यात रेक तयार करून त्यावर अळीचे संगोपन करायचे आहे समजण्यासाठी पुढील फोटो पाहु शकता.
 

 

  


4 comments:

Featured post

🌱 गांडूळ खत निर्मिती vermicompost– एक नैसर्गिक वरदान ...! प्रोजेक्ट रिपोर्ट सोबत

🌱 गांडूळ खत निर्मिती – एक नैसर्गिक वरदान ✍ ️ प्रस्तावना: आजच्या काळात रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतीची नैसर्गिक गुण...