Saturday, 31 March 2018

रेशीम उद्योगच का ?


आपल्या देशात रेशीम उद्योग व तुती लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. देशात १७,००० मे टनांपेक्षा जास्त रेशीम धाग्याची निर्मिती होते व ६० हजाराहून अधिक खेड्यात हा उद्योग राबविला जातो. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱ्या या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातही हा उद्योग अधिक फायदेशीर ठरत आहे. योग्य पाण्याचे नियोजन केले असता इतर पिकांच्या तुलणेत तुतीला कमी पाणी लागते. व उत्पन्न भरगोस मिळते. रेशिम उद्योगात इतर पिकांच्या तुलनेत फारच कमी धोका आहे. ज्या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध आहे, तिथे वर्षभर आपण रेशिम कोशांचे उत्पन्न घेऊ शकतो.

आज विदर्भातही मोठ्या प्रमाणात तुती लागवड क्षेत्र वाढले आहे. एकदा तुती च्या रोपांची लागवड केली तर ती पंधरा वर्षापर्यंत आपल्याला पाला देतात. जरी एखादा वर्ष चुकुन पाऊस कमी पडला तरी तुती ची झाडे जिवंत राहु शकतात.

यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटक संगोपन व धागा निर्मितीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. इतर अनेक नगदी पिकांच्या तुलनेत तो अधिक फायदेशीर आहे. या उद्योगामुळे शहरी संपत्ती सहजपणे ग्रामीण कारागिरांकडे वळली जाते व दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. उच्च प्रतीच्या रेशमास जागतिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता, दुबार (बायव्होल्टाईन) जातीच्या कोष उत्पादनाकडे वळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा/तंत्राचा वापर करून तुतीची लागवड करणे फायदेशीर ठरेल. तुती रेशीम उद्योगाचा यश हे सर्वस्वी तुतीच्या एकरी उत्पादित होणाऱ्या पानांवर अवलंबून आहे. रेशीम उदोगाच्या यशस्वी उत्पन्नाच्या ३८.२ टक्के भाग सकस तुती पानांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

रेशीम उद्योग' या जोड व्यवसायाचे मूळ तूती लागवडीत दडले आहे हे सर्वश्रृतच आहे. घरच्या गृहिणीलाच नव्हे तर आजी - आजोबा आणि नातवंडांनाही फावल्या वेळात घरच्या घरी रोजगाराची संधी यातून मिळू शकते. शिवाय महिन्याकाठी हमखास उत्पन्न आहेच. परंतु त्यासाठी तंत्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे.

वरील मुद्यावर विचार केला असता इतर शेती संमाधित उद्योगापेशा रेशिम शेती सरस ठरणार........च



पुढील पोस्ट मध्ये तुतीच्या विविध जातींविषयी माहिती घेणार आहोत........ धन्यवाद

Friday, 30 March 2018

साधारण माहिती......नक्की वाचा


*तुती बाग अन् रेशीम कीटकांचे संगोपन*

तुती बागेत पालापाचोळा, पाचटाचे आच्छादन करावे. अंडीपुंजांची वाहतूक सकाळ किंवा संध्याकाळी करावी. कीटकसंगोपनगृहाच्या छतावर उसाचे पाचट, गवताच्या पेंढ्यांचे एक-दीड फूट आच्छादन करावे. 

सध्या तापमानात चांगली वाढ झालेली आहे. अशावेळी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडे तुती बाग व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे.                        सध्या रेशीम कीटकसंगोपनातील बाल्यावस्था, प्रौढावस्था ते रेशीम कोष विक्रीपर्यंतच्या विविध अवस्था चालू असतील, तर ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, असे शेतकरी नवीन बॅच घेण्याच्या तयारीत असतील, अशा सर्व रेशीम शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात विविध टप्प्यांवर काही आवश्यक उपाययोजना केल्यास उन्हाळ्यातदेखील दर्जेदार कोष उत्पादन घेणे शक्य आहे. 

*तुती बाग व्यवस्थापन -* 
👉🏻१) उन्हाची तीव्रता दुपारी जास्त असल्याने तुती बागेला दुपारी पाणी देण्याऐवजी सकाळी किंवा दुपारनंतर पाणी द्यावे. दुपारी पाणी दिल्यास उन्हामुळे जमीन तापलेली असते. त्यामुळे पाणी गरम होऊन तुतीच्या मुळांवर तापमाचा परिणाम होऊन मुळांची कार्यक्षमता कमी होते. 
👉🏻२) उन्हाळ्यातील बाष्पीभवनामुळे पाणी वाया जाऊ नये याकरिता तुती बागेत आच्छादन करावे. 
👉🏻३) ठिबक सिंचन संचाची दुरुस्ती करून तुती बागेत संचाचा पूर्ण कार्यक्षेतेने वापर करावा. 

*अंडीपुंज वाहतूक -*
👉🏻१) ऊन कडक असल्याने अंडीपुंजांची वाहतूक दुपारच्या रखरखत्या उन्हात केल्यास अंड्यातील उपलब्ध पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी गर्भ कमकुवत राहणे, अति उष्म्याने गर्भ मृत होणे, हॅचिंग कमी होणे, हॅचिंग एकाच वेळी न होणे (अंड्यातून रेशीम कीटक बाहेर येण्याच्या क्रियेला हॅचिंग असे म्हणतात.) यासारखे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी अंडीपुंजांची वाहतूक सकाळ किंवा संध्याकाळी करावी. 
👉🏻२) अंडीपुंजांची वाहतूक प्लॅस्टिक कॅरी बॅग, ब्रिफकेस, मोटारसायकलची डिक्की, बॅगेतून न करता अंडीपुंज वाहतुकीसाठी केंद्रीय रेशीम मंडळाच्या सी.एस.आर. अँड टी.आय. म्हैसूर यांनी सुचविलेल्या विशिष्ट अंडीपुंज वाहतूक बॅगेतून करावी. ते शक्य नसल्यास कापडी सुती पिशवी ओलसर करून त्यातून अंडीपुंज वाहतूक करावी. त्यामुळे गारवा रहातो. 

*रेशीम कीटकसंगोपन -*
रेशिम आळीचे जीवनचक्र
👉🏻१) रेशीम कीटकांच्या एकूण पाच अवस्था असून, पहिल्या दोन अवस्थांना बाल्यावस्था तर उर्वरति तीन अवस्थांना प्रौढावस्था असे म्हणतात. पहिल्या दोन अवस्था छोट्या खोलीत प्लॅस्टिक ट्रेमध्ये करतात. छोट्या खोलीत कीटकांना आवश्यक तापमान व आर्द्रता योग्य प्रमाणातच राखणे सोपे असते. 
👉🏻२) चौकी कीटकसंगोपनगृहातील तापमान व आर्द्रता योग्य प्रमाणात राहण्यासाठी कीटकसंगोपनगृहाच्या आतील बाजूने भिंतीच्या चारही बाजूंनी वाळूचे बेड तयार करून त्यावर दिवसभरात वेळोवेळी पाणी शिंपडावे. 
👉🏻३) चौकी ट्रेमध्ये कीटकशय्येभोवती (बेडभोवती) सुती कापडाच्या ओलसर पट्ट्या ठेवून बेड पॅराफीन पेपरने झाकून ठेवल्यास ट्रेमध्ये तापमान व आर्द्रता योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते. 
👉🏻४) चौकी कीटकसंगोपनगृहाच्या छतावर उसाचे पाचट अथवा गवताच्या पेंढ्यांचे एक-दीड फूट आच्छादन करावे. चॉकी कीटकसंगोपनगृहाच्या बाहेर पाच फूट अंतरावर उंच झाडी असल्यास चौकी कीटकसंगोपनगृहातील तापमान घट होण्यास मदत होते. 
👉🏻५) केंद्रीय रेशीम मंडळाच्या सी.एस.आर. अँड टी. आय. म्हैसूर यांच्या संशोधनानुसार बाल्यावस्थेतील रेशीम कीटकाच्या पहिल्या अवस्थेकरिता तापमान २८ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८५ ते ९० टक्के तर दुसऱ्या अवस्थेकरिता तापमान २७ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८५ टक्के आवश्यक आहे. 
👉🏻६) दैनंदिन तापमान व आर्द्रता नोंदीकरिता प्रत्येक शेतकऱ्याकडे तापमापी/ आर्द्रतामापी इ. उपकरणे असावीत. 
👉🏻७) उर्वरित तीन अवस्थांना प्रौढावस्था असे म्हणतात. या तीनही अवस्थेच्या रेशीम कीटकांचे संगोपन चॉकीपेक्षा मोठ्या कीटकसंगोपनगृहात रॅकवर फांदी पद्धतीने केले जाते. कीटकसंगोपनगृह आकारमानाने मोठे असल्याने संगोपनगृहात तापमान व आर्द्रता योग्य प्रमाणात राखणे काहिसे अवघड असते. 

*तापमान व आर्द्रता नियोजन -*
👉🏻१) रेशीम कीटकांच्या अवस्थेनुसार आवश्यक तापमान व आर्द्रता कीटकांच्या सुदृढ वाढीस पोषक ठरते. 
कीटकसंगोपनगृहास पुरेशा खिडक्या तसेच भिंतीच्या वरील व खालील बाजूस व्हेंटिलेटर्स असल्याने हवा खेळती राहते. खालच्या व्हेंटिलेटर्समुळे बाहेरील थंड हवा आत येणे व वरच्या व्हेंटिलेटर्सने कीटकसंगोपनगृहातील गरम व दूषित हवा बाहेर जाते. अशावेळी खिडक्यांना एक्झॉस्ट फॅन असेल तर फायदेशीर ठरते. 
👉🏻२) कीटकसंगोपनगृहातील सिमेंटचा कोबा असेल, तर भिंतीच्या चारही बाजूंनी नाली काढून त्यामध्ये पाणी साठवून ठेवल्यास, खालच्या बाजूच्या व्हेंटीलेटरमधून बाहेरील हवा आत येताना थंड होऊन तापमान कमी होण्यास मदत होते. हे शक्य न झाल्यास गृहाच्या आतील चारही भिंतीच्या बाजूंनी वाळूचे बेड तयार करून त्यावर दिवसभरात वेळोवेळी पाणी शिंपडल्यास चांगल्यापैकी गारवा राहतो. 
👉🏻३) कीटकसंगोपनगृहातील कीटकसंगोपनगृहापासून पाच फूट अंतरावर उंच झाडी असल्यास फायदेशीर ठरते. वेल लावल्यास सावलीद्वारे तापमान घट होऊन उष्ण हवा काही प्रमाणात थंड होण्यास मदत होते. तसेच छतावर उसाचे पाचट, गवताच्या, पाणकणसांच्या पेंढ्यांचे एक-दीड फूट आच्छादन करावे. 
👉🏻४) कीटकसंगोपनगृहाभोवती चारही बाजूंनी शेडनेटच्या बाहेरच्या बाजूने बारदान लावून दिवसातून ३ ते ४ वेळेस बारदाना पाण्याने ओला केल्यास शेडमधील तापमान कमी होण्यास मदत होते. काही शेतकरी छतावर फॉगर लावतात. फॉगरचे पाणी जमिनीवर पडून वाया जाऊ नये यासाठी शेडनेटच्या बाहेर चारही बाजूंच्या बारदान्यावर फॉगरचे पाणी पडून बारदाना ओला राहील अशा पद्धतीने व्यवस्था करतात. 
👉🏻५) प्रत्येकाने दिवसभरातील सकाळ, दुपार, संध्याकाळची कीटकसंगोपनगृहातील तापमान व आर्द्रतेची नोंद लेखी स्वरूपात ठेवावी. याचा उपयोग सध्याचे तापमान, आर्द्रता माहिती होण्यास त्याप्रमाणे उपाययोजना करण्यास होतो. तसेच या नोंदीचा पुढील वर्षीदेखील उपयोग होतो. 
👉🏻६) विक्रीयोग्य तयार झालेल्या कोषांची वाहतूक पातळ बारदान्यातून सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वातावरणात करावी. 

*प्रौढावस्थेनुसार आवश्यक तापमान व आर्द्रता -*
रेशीम कीटक अवस्था---- तापमान (अंश सेल्सिअस)------- आर्द्रता (टक्के) 
तिसरी अवस्था---------------२६-------------------------------८० 
चौथी अवस्था----------------२४ ते २५-------------------------७५ 
पाचवी अवस्था--------------२३ ते २४--------------------७०

तुतीची लागवड

तुती बेणे तयार करणे:
         तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत.

तुती बेण्यावरील रासायनीक प्रक्रिया:
तुती कलमे तयार केल्यानंतर जमीनतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी खालील प्रमाणे बेण्यावर रासायनिक प्रकिया करावी.
1) थॉयमेटच्या 1 टक्के द्रावणात कलमे 4 ते 5 तास बुडवून ठेवावेत.
2) बुरशी नाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे 1 टक्के द्रावणात तुती बेणे 4 ते 5 तास बुडवून ठेवाव्यात. 
3) तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत या करिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.
तुतीचे लागवड अंतर:
सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील शेतकरी तुतीची लागवड करतांना 3 द 3 अंतरावर लागवड करीत होते. परंतू आता सन २०१७ -१८ पासून नविन सुधारीत पध्दतीनुसार फांदी पध्दत किटक संगोपनामध्ये वापरली जात असल्यामुळे फांदी पध्दतीसाठी महाराष्ट्रात नव्यानेच रेशीम संचालनालया मार्फत तुती लागवडीसाठी ५* ३ * ५  फुट  तुती कलमांची लागवड करवून घेण्यात येते. या पध्दतीमध्ये तुती झाडाची सं'या एकरी 10890 इतकी बसते. त्यामुळे प्रति एकरी पाल्याच्या उत्पादनात  पध्दतीपेक्षा दुपटीने वाढ होते.

पट्टा पध्दतीच्या तुती लागवडीपासून फायदे:
1) या पध्दतीमुळे झाडाची सं'या मोठया प्रमाणात वाढते.
2) तुती लागवडीमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सुर्यप्रकाश सर्व झाडांना मिळाल्यामुळे तुती पाल्याची प्रत चांगली मिळते व पाल्याचे उत्पादन ही भरपूर प्रमाणात वाढते.
3) आंतर मशागत करण्यासाठी सोईचे होते.
4) कोळपणी करुन तुती झाडांच्या रांगामधील तण काढू शकतो. त्यामुळे निंदणी करील खर्च कमी करता येतो.
5) बुराशीपासुन होणारे रोग पानावरील ठिपके, भूरी व तांबेरा यांचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो.
6) शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर दोन सरीमध्ये पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत होते व कमी पाण्यात लागवडीची जोपासना करता येते.
7) मधल्या पटयात भाजीपाला व इतर अंतर पिके घेऊन बोनस उत्पादन मिळवीता येते.

तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी:
1) लागवडीकरिता किमान सहा महिने जूने व बागेस पाणी दिलेले तुती बेणे वापरावे. त्यानंतर
2) तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही.
3) तुती बेणे छाटणी धारदार हत्याराने किंवा सिकॅटरने 3 ते 4 डोक्यावरच करावी. जास्त लांब काडी तोडू नये.
    बेने तोडण्यासाठी आता मशीन पण आल्या आहे ज्यांना जास्त लागवड करायची आहे त्यांना ही  फायादेशीर  आहे
 4) तुतीची लागवड ५* ३ * ५  फुट अथवा इतर अंतरावर जोड ओळ पध्दतीनेच करावी.
5) तुतीची काडी लावताना 3 डोळे जमिनीत व एकच उभा डोळा जमीनीवर ठेवावा. उलटी काडी लावू नये.
6) जमिनीत वाळवी व बुरशीचा प्रादूर्भाव असल्यास तुती बेण्यास क्लोअरपायरीफॉस, बावीस्टीन / डायथेन एम-4 अथवा कॉपर ऑक्सी क्लोराईड यांची बेणे प्रक्रिया करुनच लागवड करावी.
7) लागवड करातांना कॅरेडिक्स,रुटेक्स किंवा आय.बी.ए. इत्यादीचा वापर करवा.
8) तुती लागवडीमध्ये नैसर्गिकरित्या 10 ते 15 % तुती अळी पडत असल्याने प्रती एकर किमान तुट अळी भरण्यासाठी 1000 रोपांची वेगळी रोपवाटीका करावी.

तुती बागेची आंतर मशागत:
तुती कलमांची लागवड केल्यानंतर 1 महिन्याने खुरपणी /निंदणी करुन गवत/तन काढावे बागेतील गवतामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही व उष्णता निर्माण होवून तुती कलमाची पाने पिवळी पडतात तसेच तुती कलमांना गवतामुळे अन्नद्रव्ये कमी पडून पाने गळून पडतात.त्यामुळे तण काढणे अतिशय आवश्यक बाब आहे. तदनंतर प्रत्येक पीकानंतर उपलब्ध साधन व अंतरानुसार बैलजोडी अथवा टॅक्टरने अंतर मशागत करावी.

तुती झाडांची छाटणी:
तुती बागेच्या आंतरमशागतीमध्ये तुती झाडांची शास्त्रोक्त पध्दतीने छाटनी करण्या फार महत्व आहे. सर्व साधारणपणे शेतकरी फांदी किटक संगोपन पध्दतीचा वापर करत असतांना तुती झाडांची / फांद्याची छाटणी विळयाने फांद्या खेचुन करतो. यामध्ये झाडांचा डींक बाहेर निघून वाया जातो. व मोठया प्रमाणावर नुकसान होते तसेच उन्हाळया झाड सुकून जाऊन गॅप पडतात या करिता शेतकऱ्यांनी तुती झाडांच्या छाटणी करीता प्रमु'याने सिकॅटरचा वापर केला पाहिजे. प्रथम वर्षी पहीले पीकझाल्यानंतर सिकॅटरच्या सहाय्याने झाडावर निवडक तीन फांद्या ठेऊन (त्रिशुल) बागायती क्षेत्रा करीता जमिनीपासुन 25 ते 30 सेमी. वर छाटणी करावी. आडव्या फांद्या खोडापासूनच काढून टाकाव्यात. तदनंतर 1 वर्ष प्रत्येक पीकानंतर झाडावर सरळ वाढणाऱ्या 7 ते 8 फांद्याची दोन डोळयावर छाटणी करुन उर्वरीत फांद्या काढून टाकाव्यात. दिड ते दोन वर्षानंतर तुती झाडाची जमिनीलगत छोटया करवतीच्या सहाय्याने कापणी करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर तुती झाडापासुन सकस व भरपुर पाला मिळतो. कमीपाण्याच्या (आठमाही) क्षेत्रामध्ये तुतीझाडाची प्रथम छाटणी जमिनीपासून एक फुटाच्यावर करावी एक फुटापर्यंत तुती झाडास आडवी फांद्यी न वाढू देता सरळ खोड वाढू द्यावे व पुढील छाटणी एक फुटाचे वर करावी. जिरायत तुती लागवड क्षेत्रात वाढविलेल्या तुती झाडाची दीड ते दोन वर्षानी 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करावी व तदनंतर प्रत्येक पीकानंतर दोन डोळे ठेऊन फाद्याची छाटणी करवी.

तुतीबागेस सिंचन:
माहे जुलै ते नोव्हेंबर - महिन्याच्या दरम्यान केलेल्या लागवडीस पावसाच्या पाण्याचा फायदा मिळतो परंतू आपल्याकडे दरवर्षी पाऊस अनियमित पडत असल्यामुळे तुती कलमांचे नुकसान होत व त्यामुळे तुती कलमांची लागवड केल्यानंतर पाऊस कमी पडल्यास किंवा 10 ते 12 दिवसाचा खंड पडल्यास विहिरीचे पाणी देवून कलमे जगतील याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर सात ते आठ दिवसाच्या अंतराने कलमें जगेपर्यंत पाणी द्यावे नंतर डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत जमिनीची प्रत पाहुन साधारणत: 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात एक वेळातुती लागवडीला 1 ते 1.5 एकर इंच पाण्याची आवश्यकता असते.

तुती लागवडीसाठी गांडुळ व इतर खताचा उपयोग:
तुती लागवड केलेल्या जमिनीत गांडुळ खत वापरणे फयदेशिर आहे. गांडुळखतामुळे जमिनीतील पाला-पाचोळा गांडुळ कुजवितात, जमिनीत हवा खेळती राहण्यासाी पोकळी तयार करतात तसेच जमिनीतील सुक्ष्म जंतुचे कार्यप्रणाली वाढवितात त्यामुळे तुती झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होवून तुती पानामध्ये कार्बोहायड्ेट व प्रथीनांचे प्रमाण देखील वाढते,

  खत वापरतांना घ्यावयाची काळजी:
खतासाठी मी मननीय सुभाष पालेकर यांची पध्दत वापरावी.

ऍझोटोबॅक्टर:
ऍझोटोबॅक्टर या जीवाणूचा प्रती एकर प्रती वर्ष 8 किलो या प्रमाणात वापर केल्यास नत्राची मात्रा 50 टक्के ने कमी करता येते. ऍझोटोबॅक्टर, रासायनिक खताचे 10 ते 15 दिवस आधी किंवा नंतर शेणखतामध्ये मिसळून (1.6 किंलो ऍझोटोबॅक्टर + 80 किलो शेणखत या प्रमाणात) आंतरमशगतीच्या वेळेत टाकावे व तदनंतर लगेचच बागेस पाणी द्यावे.

तुतीबागेत रासायनिक खते हे फक्त माहिती साठी ....माझे वयक्तिक मत आहे कि खतासाठी  मननीय सुभाष पालेकर यांची पध्दत वापरावी.
तुतीची वाढ योग्य होणेसाठी रासायनिक खताची मात्रा देणे महत्त्वाचे आहे. तुती लागवड केल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात कलामांना मुळे फुटतात. तेव्हा पहिली मात्रा अडीच महिन्यांनतर एकरी 24 किलो नत्र, स्पुरद, पालाश रिंग पध्दतीने तुती झाडांचय बाजुला गोल खड्डे करुन द्यावे व खत दिल्यानंतर त्यावर मातीचा भर द्यावा. जेणेकरुन दिलेले खत वाया जाणार नाही. दुसरा डोस 3 ते 4 महिन्यांनी एकरी 24 किलो नत्र रिंग पध्दतीने द्यावा अशी दोन वेळा रासायनिक खताची मात्रा पहिल्या वर्षी द्यावी. तुतीच्या बागेस माती परिक्षण करुनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शेणखत व रासायनिक खते जमिनीत 8 ते 10 सेमी खोलवर टाकावीत. रासायनिक खतांचा वापर कराताना एकच मुलद्रव्यांची खते जसे नत्राकरिता अमोनियन सल्फेट, स्पुरादाकरिता सिंगल सुपर फॉस्फेट व पालाशकरिता म्युरेट ऑफ पोटॅश यांचा प्राधान्याने वापर करावा.

रासायनिक खते:
नेहमीच प्रत्येक पिकाच्या छाटणीनंतर अंरमशागत झालेनंतर कोंब फुटतेवेळी 14 ते 21 व्या दिवशी देण्यात यावे.

तुतीच्या झाडांवरील रोग व नियंत्रण:
इतर झाडांप्रमाणेच तुतीच्या झाडांवर ही बरेच रोग आहेत. वेळेवर सर्व पाला वापरला गेल्यास मात्र या रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळून येत नाही. तसेच ठरावविक रोगांमुळे पुर्ण झाडाचे नुकसान झाले आहे व त्यामुळे पुर्ण पीक पाया गेले असे कधीही आढळून आलेले नाही. तरी देखील काही महत्वाच्या रोगांची व जे महाराष्ट्रात मु'यत्वे आढळून येतात अशा रोगांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

कलमावरील बुरशी:
तुतीच्या लागवडीच्या वेळेस कलमास शेतकरी, बुरशीनाशक द्रावणात बुडवत नाहीत. अतिपाण्यामुळे किंवा जास्त आर्द्रतेमुळे सालीच्या आतील बाजूस काळी बुरशी येते, यामुळे झाडास फुटवा येत नाही किंवा आलेला फुटवा जळून जातो.
उपाय:
बुरशी नाशक द्रावणात तुती कलमे लावण्यापूर्वी 5-10 मिनिटे बुडवावीत व मग लागवडीस वापरावीत. प्रादर्भाव जास्त असेल तर फुटवा झालेवर देखील झाडांवर औषधे फवारावे.

वाळवी/उदई:
हलक्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव निश्तिच होतो. शेतकरी भारी जमीन सहसा तुती लागवडीसाठी वापरत नाहीत. त्यामुळे हलक्या जमिनीत लागवड केली की त्या जमिनीत मोठया प्रमाणात वाळवीचा प्रादुर्भाव होतो. तसेच शेणखतातून जमिनीत उदई अथवा उदडीचा प्रादुर्भाव होतो. उदई कोवळी कांडी कुरतडून खातात व झाडांची मर वाढते. एकरी झाडांची सं'या कमी होते.
उपाय:
1. लागवड करतांना क्लोरपायरिफॉसच्या द्रावणात, कांडया (कलमे) बुडवून लावावेत.
2. फुटवा झाल्यावर फयुरॉडॉन औषध मुळांजवळ दिल्यास वाळवी अथवा उदईचा त्रास होत नाही. किंवा कुठलेही वाळवी नाशक औषध वापरावे त्याचा परिणाम संपल्यानंतरच अळयांचे किटक संगोपन घ्यावे. झाडांची मुळे खोलवर गेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर हा त्रास होत नाही.

पानांवरील बुरशी:
रोगाचे कारण फायलेक्टिनिया कोरिलीया, कालावधी पावसाळा व हिवाळा. तुती बागेतील पाने वेळेवर वापरली नाहीत व ज्या बागेत प्रकाश व्यवस्थित येत नाही. अशा बागेतील पानांवर बुरशीचा प्रादुर्भाव लगेच होतो. म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठ म्हणजेच पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसतात हे टाळण्यासाठी वेळेवर प्रमाणात अंडीपुंज घेऊन पाल्याचा वापर करावा.
उपाय:
वेळेत पाल्याचा वापर केल्यास रोग आढळत नाही, तथापी रोग मोठया प्रमाणात आढळयास पानांवर 0.2 टक्के बाविस्टीन अथवा 0.2 टक्के डायनोकॅप द्रावण फवारावे. फवारणीनंतर वीस दिवसांनी पाने वापरता येतात.

झाडांवर आढळून येणारी कीड:

टूक्रा (बोकडया):
लक्षणे:
1. शेंडयाच्या पानाचा आकार बदलतो.
2. पाने कोमजल्यासारखी दिसतात किंवा घडया पडून आकसतात.
3. ज्या फांदीवर टूक्रा आढळतो, तो भाग जाड किंवा चपटा बनतो.
4. पाने गडद हिरव्या रंगाची बनतात.

उपाय:
1. टूक्रा रोग असलेले झाडाचे शेंडे तोडून जाळून टाकावेत.
2. 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात (10 लिअर पाण्यात 50 ग्रॅम साबण टाकवा) 0.2 टक्के डी.डी.व्ही.पी. (न्युआन 2 मि.ली. 1 लिटर पाणी) चे द्रावण तयार करुन झाडांवर फवारावे.
3. क्रिप्सोलिनस मौंटेजरीचे 100 प्रौढ किटक 10 ते 12 हजार तुतीच्या झाडामध्ये सोडावेत.

Wednesday, 28 March 2018

राम राम मित्रांनो ........

                                                                             ।। श्री राम समर्थ ।।

नमस्कार..... 

                  माझ नावं आकाश हनुमंत पोंगडे ,तसा मी प्रोफेशन नी आय. टी  इंजीनियर चार वर्ष या क्षेत्रात काम केलं पैसा बऱ्यापैकी मिळत होता. सिस्टिम ऍडमिन असल्यामुळे सर्व्हर आणि मी.....आणि माझं केबिन....माणसांशी तसा काहीसाच संपर्क... त्या निर्जीव वस्तुमध्ये माझा जिव कोंडल्यासारखं होऊ लागलं, ना घरच्यांना वेळ देऊ शकत होतो ना स्वतःला. मग  मी ठरवलं काहीतरी वेगळं करायचं निसर्गाच्या आणि आपल्या माणसांसोबत........ असचं एकदा ऑफिस मध्ये इंटरनेट वर ब्राउजिंग करताना रेशिम शेती (sericulture) बद्द्ल मला कळाल ....ते पाहून मला...ते इंट्रस्टींग वाटल .....आणि मी त्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात करु लागलो. इंटरनेट वर खुप शोधुन सुध्दा मला मनासारखी माहिती मिळत नव्हती, आणि जरी मिळाली तरी या ठिकाणी थोडी त्या ठिकाणी थोडी अशी माहिती मिळत होती ही माहिती मला समाधानकारक वाटत नव्हती. रेशिम शेतीची पुर्ण माहिती मिळाल्याशिवाय तर मी या व्यवसायात कसा उतरणार.... !

    आज मी स्वतः एक रेशिम शेतकरी आहे आणि खुप खुश आहे. हा ब्लॉगचा उहापोह काढण्यामागे एकच उद्देश जर कुणाला ही रेशीम शेती करायची असेल तर त्याला पूर्ण माहिती एकाच जागेवर मिळावी आणि जमेल तितक्या सरळ भाषेत आणि जे लोक रेशिम शेती करत आहेत त्यांना याबाबत अपडेट ठेवण्याचा एक प्रयत्न.....आणि वेळोवेळीइतर देखील माहिती तुमच्याशी शेअर करील. 

रेशिम अळीचे संगोपन करून कोष निर्मीती करणे यालाच थोडक्यात रेशीम शेती म्हणतात.
आणि हो बरका याचा कोशापासूनच रेशमी धागा तयार केला जातो, या धाग्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मोठी मागणी आहे. याबद्दल देखील मी तुम्हाला सविस्तर माहिती देईलच.  
 
 रेशिम अळीचे मूळ खाद्य हे तुतुचा पाला आहे, रेशिम शेती करण्यासाठी किमान १ एकर शेती हवी आहे,यात तुतीची लागवड करावी लागते. १ एकर तुतीची लागवड केली तर साधारण २४ बाय ४० चे शेड आवश्यक आहे, यात रेक तयार करून त्यावर अळीचे संगोपन करायचे आहे समजण्यासाठी पुढील फोटो पाहु शकता.
 

 

  


Featured post

🌱 गांडूळ खत निर्मिती vermicompost– एक नैसर्गिक वरदान ...! प्रोजेक्ट रिपोर्ट सोबत

🌱 गांडूळ खत निर्मिती – एक नैसर्गिक वरदान ✍ ️ प्रस्तावना: आजच्या काळात रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतीची नैसर्गिक गुण...